नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व निवळ साहित्यिक, महाकवी, राजकारणी एवढेच मर्यादीत नसून नामदेव ढसाळ हे नाव हजारो वर्षे इथल्या धर्माने, जातीने, कर्मकांडाने माणुसकिच्या गावकुसाबाहेर निरंतर सडवत ठेवलेल्या हजारो पिढ्यांचा अजरामर बंडखोर भाष्यकार आहे. हिंदू वर्णव्यवस्थेने समाजाच्या ज्या मोठ्या समूहाला जनावरांचेही नैसर्गिक जगणे शेवटच्या माणसासाठी थोर ठरावे इतक्या अमानुष तर्हेने समाजाच्या सर्व क्षेत्रातून कायम नासवले, अस्पृश्य माणसाचे जगणे आणि मरणेही टाचा घासून तडफड करत जीव सोडणार्या एखाद्या प्राण्याच्या अवस्थेहून बत्तर केले गेले, नामदेव ढसाळ हा त्या तमाम गावकूसाबाहेर फेकल्या गेलेल्या घटकांचा लढवय्या भाष्यकार आणि सार्वकालिक इतिहासकार आहे. फॅन्ड्री मधल्या जब्याने ज्या ताकदीने आणि त्वेषाने दगड भिरकावला त्याच ताकदीने ढसाळांच्या प्रत्येक शब्दांचा अंगार माणुसकीला मोताद झालेल्या ह्या गावावर जळजळीतपणे कोसळत राहिला, इथल्या व्यवस्थेच्या तंटबंदीला मूळापासून उखडून उध्वस्त करत राहिला आणि अंतिमत: ‘माणसाचेच गाणे माणसाने गावे’ ह्या ओळी गुणगुणत नामदेव ढसाळांचे शब्द माणुसकीचे, सम्यकतेचे आकाश विस्तारत राहिले. ढसाळ
Comments
va kadhi nasatcha...
very well written.... (y)..