Posts

मेणाची माणसं

मेणाची माणसं वितळत जातात मेणाच्याच मेणबत्त्यांसारखी. सिमिट्रिक सुरक्षित जगलेल्या आयुष्याचा टीचभर ओघळ अस्ताव्यस्त पसरवत जातात. मेणाची माणसं मोर्चेही काढतात मेणबत्त्यांचाच. एका झापेत वा-याच्या सपकन विझूनहि जातात. मेणाची माणसं चेतवू शकत नाहीत छ्टाक्भर प्रकाशही. त्यांच्यातल्या वाती केव्हाच्याच मोडलेल्या असतात. फारफारतर मेणाची माणसं जमंल तसं चिकटून राहतात एकाचजागी. कोणीतरी बुड उचकटे पर्यंत गपगुमान पिघळत राहतात आपल्याच सोयीस्कर स्थितप्रद्न्य  मध्यमवर्गीय चिरंतन कोषात.

नाव नसलेले काही लेख - २.

तसं पाहिलं तर आताशा आपण जे कायपण लिहित असतो ते आल्मोस्ट  कुणी घंटा वाचत नाही. तरीही हि लिहिण्याची अगम्य खाज का काय कायमची शमत नाही. अधूनमधून उफाळोन येतेच. थाड थाड करत क्यालेंडरचि पानं उडत जातात. वयाचं नामोनिशान अजून दिसत नसलं तरी आपण झिजत असतोच प्रत्येक क्षणाला. कुणाला ते झिजणं मनासारखं वाटतं. तर कुणाला आपण झिजतोय ह्याची काहीच लेणदेण नसते. तर कुणी आपल्यासारखे चुतिये आपण का, कशासाठी झिजतोय ह्याचं विच्छेदन करण्यात अक्षरांची होळी पेटवतात... कोण्या एका भुक्कड संध्याकाळी आत्ममग्न होत पाहिलेली स्वप्ने - उदाहरणार्थ चळवळ, लेखन, राजकारण, प्रशासन, इतिहास, कविता  इत्यादी इत्यादी फालतू शब्दबंबाळ जांगडगुत्ता नुसता… ह्याच्यापासून आपण मैलो दूर आलोय आता. प्राथमिकता बदलून गेल्यात. किंबहुना ज्या गोष्टी येडझव्या बुर्झ्वा वाटायच्या त्याच गोष्टीत जगण्याची प्राधान्यक्रमता ठरू लागलीय. शेवटी आपणही ग्लोबलायझ होता होता येड्यात निघालो च्यामायला. किंवा असंही असू शकतं कि भुक्कड संध्याकाळी पाहिलेली स्वप्ने खरोखरच बिनडोक होती. हिरोइझम का फ्यांटसिझम चा नाद होता बहुतेक. जवळपास ते सगळं संपल्या सारखं वाटू लाग...

नाव नसलेले काही लेख - १. ५

आयुष्यातील गेली तीनेक वर्षे मानसिक दृष्ट्या फारच अस्वस्थ, ओढाताणीची, अजीर्ण  जावू लागली आहेत. मनात प्रचंड खदखद साचू लागली आहे. नेमकं काय होतंय हे सांगण्याच्या पलीकडे गेल्यासारखं वाटू लागलंय. शब्दांची कधी नव्हे ते कमतरता भासू लागली आहे. सगळा खटाटोप अनाकलनीय वाटू लागला आहे. एका झटक्यात सगळी भेंचोत नाती तोडून द्यावीत आणि लांब कुठे तरी निघून जावे असे वाटू लागले आहे. ब-याच वेळेस आपल्या सर्वांगाची वाफ झाली  तर किती बरे होईल असे वाटू लागलेय. पुस्तकं वाचायला घेतली तर चारेक पानं वाचूनच गरगरायल्या सारखं होतं आजकाल. ज्या लोकांना "हरामखोर" हि पदवी लावून मेंदूतून format केलं तीच लोकं  व्हायरस सारखी मनात कचकचून आठवू लागतायत. काही लोकांनीही आपल्याला त्यांच्या आयुष्यातून अक्षरश: format केलं, हाकलवून दिलं नकळत अलगद … त्यांनाही आपण असेच पछाडत असू का? कि ही माझीच स्वयंभू खाज आहे परत परत तेच तेच चेहरे आठवण्याची? असे एक ना हजार फालतू छिनाल प्रश्नं… रिकाम्या धरणासारखे, वळवळना-या गांडूळा सारखे, पालीच्या तुटलेल्या शेपटी सारखे, काय काय अन काय काय!!! जे काही वाटतंय ते व्यवस्थित शब्दांत सुद्धा सा...

नाव नसलेले काही लेख - १

मी अत्यंत भिकारचोट झालो आहे असे मला आजकाल वाटू लागले आहे. म्हणजे बक्कळ पैसे ब्यांकेत आणि खिशात असूनही मी डेंजर भिकारी झालोय असं वाटतंय. हे भिकारपण बहुतेक आर्थिक सोडून बाकी सगळ्या ज्ञात अज्ञात प्रकारचं असावं. सामाजिक, मानसिक, शारीरिक, नैतिक, तार्किक, बौद्धिक, पारंपारिक, लौकिक, वैचारिक  आणि काय काय कुणास ठावूक! कित्येक - "इक" शब्दांत असणा-या व्याख्यांचं हे भिकारपण माझ्यापाशी गेल्या चारेक वर्षात बक्कळ जमा झालंय. पैसे सोडून बाकी काहीच आपले जवळचे "नसण्याची" ही जीवघेणी श्रीमंती मला चिक्कार वेळेस नकोनकोशी वाटते. आणि खोटं कशाला बोला - ब-याच वेळेस हवीहवीशी देखील वाटते. मनामध्ये सतत उल्टेपालटे विचार येतात. म्हणजे काहिच्याकाहि. उदाहरणार्थ - आत्ता ह्या क्षणाला मी मेलो तर काय होईल? कुणाला आणि किती काय फरक पडेल? मी लांबलेल्या, आधी असलेल्या आणि आता नसलेल्या आणि त्यातल्या त्यात  आता जवळ असणा-या मित्रांना शेवटी काय बोलेन. फेसबुक वापरेन कि whatsapp वापरेन. मी कितीही सिरीयस होऊन आपले शेवटचे  मनोगत त्यांना व्यक्त केले तर ते नुसता "हम्म"  असा हरामखोर ...

Let the lotus bloom

The night owls and the hideous ghouls, Wicked witches and the plain damned fools,  All cry out in unison, Oh lets stop the sun, Lets together sell our souls to the devil, In the dark night be unending the revel, To redeem to righteous and erase the blight, The sun will rise and shine bright,  From the filth, muck, doom and gloom, Let there be light and healing lotus bloom.

The AAP: An appraisal

The birth and the rise of the Aam Aadmi party has been a truly remarkable series of events in India’s recent history, events that had the potential to  rekindle a cynic’s faith in the beneficial - self regulating and self correcting - aspects of a democracy. It was a wave of popular discontent, hope and idealism facing a shameless, high-handed, thoroughly and brazenly corrupt Congress establishment drunk with power. The Congress, like a drunkard at the peak of an alcohol fueled delusion of power and invincibility was knocked out cold by a tight slap of public anger in the Delhi assembly elections. The assembly election results were a culmination of an anti graft movement led by Anna Hajare, Swami Ramdev, Arvind Kejriwal along with several other civil society luminaries. The qualitative and quantitive characteristics of the AAP victory were astonishing. Maybe better than the AAP leaders estimated, and perhaps wanted. The AAP was still more of a loose popular movement manned ...

Swami Ramdev, Anna Hajare and the war against corruption

Anna is in the focus and limelight currently, and righfully so, due to his battle against corruption. This is a battle which he has been fighting for a long time time now. Swami Ramdev, another iconic and inspiring figure, a rishi, sage of the modern age, also took up the mantle of this fight against corruption through his bharat swabhimaan andolan. It is no wonder that these two good men along with other good men and women, like Arvind Kejriwal and Kiran Bedi, joined forces. But who took the lead in bringing all of them together? Anna's battle was primarily limited to Maharashtra, and only lately when the central government under Dr. Manmohan Singh sought to dilute the Right to Information Act, Anna's pet project, he had to directly confront the central government. Anna issued an ultimatum to the government that he would go on an indefinite hunger strike to protect the Right to Information Act. After sensing that ignoring this threat would invite a nationwide agitation, go...