Posts

Inheritors of Afzalkhan’s legacy

During the last few days of the Ganesh festival celebrations in Miraj, a town in western Maharashtra, festering tensions gave way to arson and rioting. These riots spread like wild fire throughout western Maharashtra. Cities like Sangli,Kolhapur,Satara,Solapur,Ichalkaranji and adjoining rural areas got engulfed in communal violence. Curfew has been imposed in many areas and the situation is still very tense. One might wonder as to what might be the reason behind this seemingly sudden eruption of violence in a generally peaceful region. A welcome arch depicting the slaying of Afzalkhan by Chattrapati Shivaji Maharaj was erected by a local Ganesh Mandal. Afzalkhan was a general in the Adilshahi court of Bijapur who had invaded Swarajya with the motive of assassinating Chattrapati Shivaji Maharaj. Permission was sought from the police and district adminitration for erecting the welcome arch, which was initially denied, but was granted afterwards. This initial denial itself is inexplicab...

अफझलखानी प्रवृत्ति आणि त्यांचे हितचिंतक

मिरज येथे गणपति उत्सवाच्या शेवटच्या काही दिवसात तणावाची स्थिति उत्पन्न होउन त्याचे रूपांतर दंगलीत झाले. त्याचे लोण पूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर पसरले. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा,सोलापूर इत्यादि शहरे आणि ग्रामीण भागामध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. अजुनही वातावरण पूर्णतः शांत झालेले नसून काही ठिकाणी संचारबंदी लागू आहे. या सर्व गोष्टींना कारण काय घडले? मिरज शहरामध्ये एका सार्वजनिक गणेश मंडळाने अफझलखान वधाची कमान उभारली. ती कमान उभी करण्यास आधी पोलिस व जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती, परंतु नंतर ती परवानगी देण्यात आली. त्यानंतर, अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मिरजेत मुस्लिम जमावाने निदर्शने केली. या गोष्टीला कारण ती कमान ठरली. त्या जमावाला उत्तर म्हणुन हिंदू जमाव एकत्रित झाला आणि दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी लाठीमार सुरु केला. पळून जाता जाता त्या मुस्लिम जमावातिल काही माथेफिरूंनी एका गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीवर दगडफेक करून मूर्तीची विटंबना केली. त्या नंतर भडकलेल्या दंगलीत अनेक गणेशमूर्तिंची तोडफोड आणि विटंबना करण्यात आली. या बातम्या वेगाने पसरल्या आणि त्याचे रूपा...

'एकादशीच्या घरी शिवरात्र'

जसवतसिंगांची हकालपट्टी झालीच शेवटी. हे तसे तर फार आधीपासूनच ठरले होते. लोकसभा निवडणूकीतल्या मानहानीजनक पराभवानंतर बहुतांश भाजप नेत्यांचे डोके फिरल्यागतच झाले होते. जसवंतसिंगानीही त्याच न्यायाने वागत जराश्या वेगळ्या पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच. तसे पाहिले तर लोकसभा निवडणूकांनंतर पक्षश्रेष्ठींना पत्रे पाठवून त्यांनी भाजपाच्या चिंतनशीलतेविषयी, पराभवाच्या जबाबदारीविषयी जेव्हा प्रश्ने उपस्थित केली तेव्हाच कमळावरचे भुंगे चिडले. हकालपट्टीच्या निर्णय म्हणजे सगळ्या भुंग्यांनी एका फरफटलेल्या दुस-या भुंग्याला चावा घेतला असेच म्हणावयास हवे! पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्धी स्वतःकडे खेचून घेणे जसवंतसिंघांना काही नवीन नाही. ए कॉल टू हॉनरःइन सर्विस ऑफ इमर्जंट इंडिया ह्या पुस्तकातही त्यांनी वादग्रस्त विधाने खळबळ उडवून दिलीच होती. हातात सत्ता नसली म्हणजे लेखणी सुद्धा फरफटते हयाचेच हे द्योतक आहे. जिना आणि फाळणीचा चघळून चघळूनही न संपलेला प्रश्न पुन्हा उपस्थित करून जसवंतसिंघांनी नेमके काय साधले कुणास ठावूक? त्यांच्या ह्या असल्या आशाळभूत वर्तनावर ताशेरे ओढणे साहजिकच होते. पण एक बाब इथे लक्षात घ्य...

कोणी कुणाचा नातलग लागू नये

कोणी कुणाचा नातलग लागू नये, तरीही प्रापंचिक अपघातात फ्रॅक्चर झालेल्या खांद्यावरून जमेल तितक्यांच्या वजनदार तिरडयांना शेवटचे गावदर्शन करवून सुखरूप पोहोचवून यावे सरकारी स्मशानात. कोणी आपल्या एकटेपणाचा सबळ पुरावा मागीतलाच तर लिहून दाखवाव्यात त्याला अश्या कविता स्वत:च्या सहीनिशी झोकदार. किंवा वर्षातून एकदा एकटेच देहू,आळंदी,पंढरपूर ची करावी आत्मशोधार्थ वारी. तरीही त्यांतल्या त्यांत चार बळकट खांद्यांची सांधेदुखी जिद्दीने पोसावी - आपल्या एकांत-मढ्याचा भार बळजबरीने सोसणारी.

"वरातीमागून घोडे"

"वरातीमागून घोडे" ह्या म्हणीचा प्रत्यय पुन्हा गेल्या आठवड्याभरात सगळयांनाच आला असेल. देशात आणि विशेषतः पुण्यात स्वाईन फ्लू चे जे थैमान चालू आहे त्याने सरकार जनतेच्या आरोग्याविषयी किती संवेदनशील आहे हेच दिसून येते. कोणी म्हणेल सरसकट नेहमीच सरकारी यंत्रणेवर खापर फोडून आपण मोकळे होते. पण हे तसे नाही. लोकांनी कुणाकडे बघायचे? का नशिबाला दोष देत डोके फोडत बसायचे? ज्या वेळेस ही साथ अमेरिका, मेक्सिको मध्ये सक्रिय होती तेव्हाच तातडीने काही उपाय योजले असते तर आज ही भित भित जगायची वेळ आलीच नसती. पण आम्ही, आमचे सगळे चॅनेल्स राखी सावंतचे लगीन होईल् का, कोणासोबत होईल ह्यातच आपले सगळे कव्हरेज खर्ची घालत होते. "जनजागॄती"ची प्रक्रिया ही काही एकदोन दिवसांची नसते. तिला ठोस कार्यक्रम असावा लागतो हे ना आमच्या राज्यकर्त्यांना कधी कळले ना जनतेने कधी स्वतःहून त्यात उत्साह दाखविला. आज देशाच्या महत्वाच्या एकामागून एक शहरात स्वाईन फ्लू चे हातपाय पसरत चालले आहेत. अपुरी यंत्रणा, प्रचंड लोकसंख्या, औषधांचा तुटवडा, धास्तावलेली जनता ह्यामुळे हे चित्र अत्यंत विदारक झाले आहे. शाळा बंद ठेवाव्यात की ...

ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात…

ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात माझ्यातल्या चौथ्या डायमेन्शनपर्यंत पेटलेला तुझा अमलताशी स्पर्श… किती छळशील अजुन…?? अद्याप माझ्या हद्दीत आला नाहीये आयुष्याच्या नाक्य...

नकळत

जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ… अगदी जमल्यासच (आणि लक्षात राहिलंच तर) फक्त तुझ्या श्वासांची एक पाकळी पाठवून दे माझ्याकडे असं म्हणालो होतो माझ्याही नकळत. माझं हे ‘नकळत’पणच तू इतकं मनावर घेतलंस की, समर्पणाची देठं लावलेल्या लक्षावधी फुलांची वादळं घेऊन आलीस माझ्या देहाच्या देशात! जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ…